बहिणीसाठी १० लाखाची पोटगी मागितल्याच्या रागातून हत्या, रेल्वे गेटमन कांबळे यांचा मारेकऱ्यास अक्कलकोट मध्ये पकडले, रोहा न्यायालयाने दिली ७ दिवसांची पोलीस कस्टडी

बहिणीसाठी १० लाखाची पोटगी मागितल्याच्या रागातून हत्या, रेल्वे गेटमन कांबळे यांचा मारेकऱ्यास अक्कलकोट मध्ये पकडले, रोहा न्यायालयाने दिली ७ दिवसांची पोलीस कस्टडी
कोलाड – प्रतिनिधी :- कोलाड येथील रेल्वेचा कर्मचारी चंद्रकांत कांबळे यांची हत्या करणाऱ्याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. बहिणीसाठी 10 लाखाची पोटगी मागितल्याने चंद्रकात कांबळे यांची मेव्हणा विजय शेट्टी यांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. हत्यारा विजय शेट्टी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी दोन दुहेरी हत्याकांड केल्याचे रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. त्याच्याकडून दोन रिव्हालवर जप्त करण्यात आले आहे. रोहा येथील राहणारे चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल हिचा विवाह विजय शेट्टी याच्या सोबत झाला होता. धाटाव येथे राहत होते. काही महिन्यांपासून विजय व त्याची पत्नी विमल यांचे पटत नव्हते. म्हणून विमल तिच्या माहेरी अर्थात भाऊ चंद्रकांत याचेकडे राहण्यास होती. ती विजय शेट्टी याचेकडे राहत होती. ती विजय शेट्टी याच्याकडे घटस्फोट मागत होती. विजय शेट्टीकडे चंद्रकांत कांबळे हे बहिण विमल हिच्यासाठी 10 लाखांची पोटगी मागत होते. त्यावरुन विजय शेट्टी याने तुझ्या भावाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी पत्नी विमल हिला दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टीम कामाला लागली. मिळालेल्या पुराव्यावरुन ही हत्या विजय यांनेच केली असल्याचे पुढे आले आणि विजयचा शोध सुरु झाला. हत्या केल्यानंतर काही दिवसांनी तो अलिबाग येथे एका मित्राला भेटून गेला होता. तांत्रिक तपासात तो अक्कलकोट, जिल्हा सोलापूर याठिकाणी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक, विकास चव्हाण, जितेंद्र चव्हाण, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, अक्षय सावंत अशी चार पथके तयार करण्यात आली होती. एक पथक अक्कलकोट येथे रवाना झाले होते. अक्कलकोट येथील स्वामी समर्थमंदिर परिसरातून विजयला पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. विजयकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह, एक एक्स्ट्रा मॅग्झीनव 18 जिवंत काडतुसे, 1 रिकामी पुंगळी, हस्तगत केले आहे. दोन्ही हत्यार त्याने चंद्रकांत कांबळे यांची हत्या करणेसाठी दोन महीण्यांपूर्वी बनारस उत्तरप्रदेश येथून दिड लाख रुपयांना त्याने विकत घेतली. अटक केल्यानंतर त्याला रोहा न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
विजय रमेश शेट्टी हा कलबुरगी, कर्नाटक राज्य येथील मूल रहिवासी असून वयाचे 15 व्या वर्षी त्याचे भावा सोबत रेतीबंदर बेलापूर येथे कामानिमित्त आला होता. त्याचे मुळ नाव लक्ष्मिकांत रेवाणसिद्धप्पा कलशेट्टी आहे. तो विजय रमेश शेट्टी या नावाने राहत होता. याआधी केल्यात दोन दुहीरी हत्या विजय हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने 90 च्या दशकात त्याची बहीण शांताबाई हिचा पती सिद्धप्पा व पतीचा भाऊ बसप्पा या दोघांची निर्घुण हत्या केली होती. तसेच सन 1999 साली उरण येथील एबीजे कंपनीचे मॅनेजर व त्याचा ड्रायव्हर अशा दोन इसमांना गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती. सदरची कामगिरी अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम,पोलिस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलि निरीक्षक विकास चव्हाण, पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रसाद पाटील, दीपक मोरे, पोलिस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, प्रसन्न जोशी, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, जितेंद्र चव्हाण, सुदीप पहेलकर, राकेश म्हात्रे, विकास खैरणार, रुपेश निगडे, पोलिस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलिस शिपाई ईश्वर लंबोटे, भरत तांदळे, बाबासो पिंगळे, अक्षय सावंत, अक्षय जगताप, ओंकार सोंडकर, मोरेश्वर ओंबळे, लालासो वाघमोडे, स्वामी गावंड, रुपेश पाटील सायबर पोलिस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी या गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *