काशिनाथ जाधव यांचे दुःखद निधन

काशिनाथ जाधव यांचे दुःखद निधन
खांब,दि.७(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील बाहे गावातील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्व परिचित असणारे काशिनाथ मानाजी जाधव यांचे रवि.दि.६ आॅक्टोबर रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
त्यांनी आपल्या आयुष्यात शेती क्षेत्राला विशेष प्राधान्य देऊन शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.तरूणांनी शेतीकडे का लक्ष द्यावे याबाबत ते नेहमी मार्गदर्शन करत.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय व मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,पाच मुली,जावई,नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार दि.१५ आॅक्टोबर रोजी तर अंतिम धार्मिकविधी १८ आॅक्टोबर रोजी निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *